पालवी फुटण्याच्या मोसमातच
माथ्यावरच्या लाचखाऊ ढगानं
बिनधास्त नकार दिला
माझ्या अंगणात बरसायला
कारण
मी कधीच म्हणालो नाही
ये रे ये रे पावसा
तुला देईन
पैसा
पैसा
पैसा
प्रिय दादा , लेक टायपिंगची बातमी ऎकली बाबा पेपरात फोटू बघितलं टिवी वर तर बघतच राह्यलो खुळ्यावानी लै कौतिक वाटलं , दादा भारी काम केलासा उर अक्षी भरुन आला आईचं सोड , बापु आपला - एवढा कठिन मानूस त्याचंबी डोळं पाणवलं बघ दादा , सावित्री आलीया माहेराला तुझ्यावर लै जीव होता तिचा पन तू म्हनला शहरातली पायजे , शिकलेली पायजे नाराज झाली बिचारी मला तर लै आवडली होती ती भेटली आज मला म्हनली - कवा येनार दादासाहेब तुमचे ? शिकायला गेला शहराला अन परका झाला हुरडा खायला येतुया फकस्त अन सारखं फोटु काढतया त्याला म्हनव एवढं लेक टायपिंग करतुयास जरा आमची चारीबी दे की दुरूस्त करून कुटपन फुटती अन आमचंच बारं चढाचं पानी काय भेटेना दादा , येतुस कारं गावाकडं ? अरे , घे की बदली करुन सायेब खुष आहे सद्या तुझ्यावर आपल्या धरणावर लै गोंधळ हाय बाबा जराशीक लावून दे की शिस्त लोकं लै नाव घेतील तुझं म्हातारी थकलीया , बापुसबी होईना पहिल्यासारखं पन तुला कुठलं जमायला म्हना वैनी मोडता घालणार पोरांनाबी नाय करमणार गावाकडं त्यातून इथल्या शाळा सगळ्या मराठी
जातजमात वाद व धार्मिक उन्माद, बलात्कार व भ्रष्टाचार, राजकीय टगेगिरी व चेल्याचपाट्यांची भांडवलशाही, दुष्काळ, गारपिट आणि शेतक-यांच्या आत्महत्या, रोजगार हमीतील चो-यामा-या आणि भृणहत्या, टॅंकरमागे धावणा-या बायाबापड्या आणि ऊसबाधा झालेले मग्रुर पुढारी आसारामी अध्यात्म आणि सुदर्शन बाजार असा विविधतेने नटलेला भारत देश..मेरा प्यारा हिंदोस्ता! जिन्हे नाझ है हिंदपर वो कहां है ? असा ‘प्यासा’ प्रश्न पुन्हा एकदा आसमंतात आहे. तो विचारण्याचे धाडस दाखवणा-यांबरोबर आम्ही आहोत. तुम्ही? मोलकरणी, हमाल – माथाडी, कामगार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजुर, दलित, आदिवासी, शुद्रातिशुद्र आणि असहाय्य महिला अशा असंघटितांच्या बाजूने आयुष्यभर लढणा-या ‘माणसां’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही? रेशन कार्ड, रोजगार, पेन्शन, सर्वांना शिक्षण, साक्षरता, प्यायला पाणी, दुपारला भाकरी, रातच्याला वाईच अंथरूण पांघरूण..... ........... मागणं लै नाही बाप्पा मूलभूत मागण्यांसाठी सतत आंदोलन करणा-या ‘साथी व कॉम्रेड’ बरोबर आम्ही आहोत. तुम्ही? पर्यावरणस्नेही विकास समन्यायी पाणीवाटप, जलवंचितांच्या
पाणी मागतात ... च्यायला लोकं उद्धट व्हायला लागली आहेत पाणी मागतात - पिण्याकरता , शेतीकरता ठोकून काढलं पायजे साल्यांना साहेबांनी म्हटलं - अहो , जलनीती घ्या कायदे करू , नियम करु येगळं प्राधिकरनच देतो की पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात ... च्यायला सायबांनी असंबी म्हटलं नदीजोड व्हायला पायजेल आहे कोर्टाचा आदेशच आहे तसा पश्चिमेच्या नद्या फिरवू की पुर्वेला ह्ये अशी वळवायची नदी अन ह्यो उचलायची पन ह्यांचं आपलं येकच पाणी मागतात ... च्यायला कान इकडं करा तुमाला म्हणून सांगतो साहेब म्हनाले - इनटरनल शिक्युरिटिला लै धोका आहे आता टॅंकरवर काम भागणार नाही , राजेहो साहेब तर म्हनतात - आता टॅंकच बोलवा टॅंक . टॅक . रणगाडा ! धडाधडा .... पाणी मागतात ... च्यायला साहेब जाऊन आले परवा चायनाला केवढी प्रगती केली राव त्यांनी - थ्री गारजेस सायबाला विचारलं एवढं सगळं जमवलं कसं त्यांनी ? साहेब म्हनले - पयले तियानमेन केलं . तियानमेन ! ते मेन !! आपण काहीच करत नाही . कशी होणार प्रगती ? पाणी मागतात ... च्यायला
Comments
Post a Comment