सहा थेंब - दुष्काळाच्या निमित्ताने
शासन
इतकी वर्षे टॅंकरवर होते
अच्छे
दिन आ गये
जेसीबी
पोकलेनचे
पाणी
न्यायालयाची पायरी चढले
जलहित
याचिकांचा महापूर आला
आम्ही
सांगतच होतो
मूळ दुखणे
कॉलेजियम मध्ये आहे
कमिटया
स्थापन होता आहेत
तसे आम्ही
"कमिटेड" आहोत
दुष्काळ
काय येतच असतात
शेवटी
निसर्गापुढे कोणाचे काय चालणार?
ठिबक
येणार
बघा,बघा, पाईपलाईन्सदेखील आल्या
नदीजोड
होणार
अगदी
आसेतू हिमाचल!
आणि
जलयुक्त
शिवार तर कवाच झालं की राव
एक पाऊस
झाला की बस...
रिमझेम
के तराने लेके आयी बरसात!!
वाफाळलेला
चहा प्या
गरमा
गरम कांद्याची भजी खा
(कांदा
जीवनावश्यक आहे)
आणि काय
हा अरसिकपणा?
दुष्काळावर
कसल्या चर्चा करता?
मेघदूत
वाचा, मेघदूत!!!
-प्रदीप
पुरंदरे
५जुलै
२०१६
Comments
Post a Comment